हॅलो राजकारण

Bogus companies : महाराष्ट्र बोगस कंपन्यांमध्ये आघाडीवर तर दिल्ली दुसऱ्या स्थानावर

हॅलो जनता, नवी दिल्ली : Bogus companies

गेल्या पाच वर्षांत, रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ३६,८५६ कंपन्या समाविष्ट असून, महाराष्ट्र या प्रकारात देशात आघाडीवर आहे. दिल्ली ३५,६३७ बोगस कंपन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

गत पाच वर्षांत तब्बल २.३३,५६६ कंपन्यांना यादीतून वगळण्यात आले आहे. याची सुरुवात २०१९-२० मध्ये ५९,९९५ कंपन्यांना हटवून झाली. २०२२-२३ मध्ये हा आकडा ८२,१२६ वर पोहोचला, तर २०२३-२४ मध्ये १६,४६५ कंपन्यांना यादीतून काढण्यात आले. विशेषतः, या पाच वर्षांतल्या चार वर्षांत महाराष्ट्रने या कारवाईत अव्वल स्थान पटकावले. सातत्यपूर्ण कारवाईमुळे या बोगस कंपन्या उघडकीस आल्या आहेत.

Bogus companies : अनेकदा कंपन्यांवर धडक कारवाई
सरकार या कंपन्यांना थेट बनावट म्हणून संबोधत नाही, तर त्यांना निष्क्रिय कंपन्यांच्या श्रेणीत वर्गीकृत करते. अशा कंपन्या त्या आहेत ज्यांनी कोणताही व्यवसाय केला नाही किंवा गेल्या दोन आर्थिक वर्षांत आर्थिक विवरणे आणि वार्षिक रिटर्न सादर केलेले नाहीत. वेळोवेळी अशा निष्क्रिय कंपन्यांवर सरकारकडून धडक कारवाई करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोणत्या राज्यात किती आहेत बोगस कंपन्या?
महाराष्ट्र – ३६,८५६
दिल्ली -३५,६३७
उत्तर प्रदेश – २२,६४४
प. बंगाल – २०,३०४
कर्नाटक – १९,२४२
हरयाणा – ९,०४७
केरळ – ७,७६३
पंजाब – २,८४३

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Bike Chori : परजिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात, चोरीच्या 5 दुचाकी हस्तगत

Dr. Ashok Uike : ब्रेकिंग : आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button