हॅलो राजकारण

Suresh Dhas : बीडच्या सरपंच हत्या प्रकरणावर सुरेश धस यांची महत्त्वाची माहिती

हॅलो जनता न्युज, मुंबई :

भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आज बीडच्या मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी या प्रकरणात नवा खुलासा केला. “या प्रकरणात एका कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती, त्यापैकी 50 लाख रुपये दिले गेले आहेत. दीड कोटी रुपये अजून बाकी आहेत. ह्या दीड कोटी रुपयांसाठी आरोपींनी काही लोक पाठवले, आणि ते लोक डायरेक्ट ‘आका’ यांच्या आदेशावरून गेले,” असं सुरेश धस यांनी सांगितलं.

आका आणि सीडीआर तपास
आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पुढे सांगितले की, “आका यांचं निर्देश असल्यामुळे हे लोक शुक्रवारी घटनास्थळी गेले. आता सीडीआर (Call Detail Record) काढून, कोण कोणाला काय बोललं, हे सर्व बाहेर येत आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की, आका या प्रकरणातून बाहेर राहू शकतील.” “बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी? सगळा फोकस आता आका पकडण्यावर आहे, त्यामुळे इतर आरोपी असले तरी त्यांनाही लवकरच पकडले जाईल. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ‘यात कुणालाही सोडणार नाही’, आणि लोकांमध्ये यावर विश्वास आहे,” असे सुरेश धस म्हणाले.

एसपींशी संवाद
सुरेश धस यांनी सांगितले की, “मी एसपींना याबाबत विचारलं, ते म्हणाले की, ‘साहेब, काही टॉप सिक्रेट्स आहेत. आम्ही तुम्हाला ते सांगू शकत नाही’. ते खरं आहे कारण तपासाच्या गोष्टी लीक झाल्या तर त्या आरोपींपर्यंत पोहोचू शकतात, आणि त्यांना विविध लोक प्रश्न विचारत असू शकतात. एसपी म्हणाले की, ‘आम्ही योग्य तपास करत आहोत, पण काही गोष्टी सांगता येणार नाहीत’. मी त्यांना ‘ठीक आहे’ असे सांगितले, आणि तपासाची टीम वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली आहे,” अशी माहिती सुरेश धस यांनी दिली.

सुरेश धस (Suresh Dhas) यांनी आपल्या आगामी कार्यक्रमांविषयी माहिती दिली. “मी उद्या परभणीच्या मोर्चाला आणि परवा पुण्याच्या मोर्चालाही जाणार आहे. 6 तारखेला राज्यपालांकडे जाण्याचे आयोजन आहे. येथे पक्षाचा विषय नाही. ही घटना अत्यंत भीषण आहे, आणि त्या संदर्भात आम्ही एकत्र आलो आहोत,” असे त्यांनी सांगितले. सुरेश धस यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाबाबतही स्पष्ट भूमिका घेतली. “बीडच्या पालकमंत्रीपदासाठी आमची पहिली पसंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. मुख्यमंत्री न झाले तरी, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील योग्य पर्याय आहेत. आम्हाला काही अडचण नाही. अजित पवार हे आमच्या जिल्ह्याला उत्तम रितीने पुढे नेतील. मी अजित दादांशी काम केले आहे, त्यांना वेड्या वाकड्या गोष्टी जमत नाहीत,” असे सुरेश धस यांनी सांगितले.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Journalist’s Day : ६ जानेवारी पत्रकार दिन ; जिल्ह्यातील १० जणांना ‘दर्पणकार’ पुरस्कार व हेल्मेट वितरण सोहळ्याचे आयोजन

Jitendra Awahad : वाल्मिक कराडप्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा

Paldhi Violence : पाळधी गावात दंगलीनंतर प्रशासनाने संचारबंदी लागू ; सात जणांची अटक, 63 लाखांचे नुकसान

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button