⁠हॅलो शेतकरी

Dharangaon : धरणगावातील शेतकऱ्याची या कारणामुळे आत्महत्या

हॅलो जनता न्युज, धरणगाव :

धरणगाव (Dharangaon) तालुक्यातील पथराड येथील ४२ वर्षीय शेतकरी अशोक अमृत लंके दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या वडिलांनी ५ जानेवारीला पाळधी आऊट पोस्टमध्ये हरवल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, ५ जानेवारीच्या दुपारी तीन वाजता ग्रामपंचायतीच्या विहिरीत पाणीपुरवठा शिपायाला त्यांचा मृतदेह तरंगताना आढळला.

अशोक लंके एक शेतकरी आहेत, ज्यांच्या नावावर कर्ज आहे. अतिवृष्टीमुळे त्यांचे शेतातील पिके वाया गेली, आणि त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या संकटात आले आहेत. अशोक यांची स्थिती सध्या अत्यंत नाजूक असून, ते हतबल झाले होते. रब्बी हंगाम पिकांसाठी पैसे नसल्याने गावात बऱ्याच लोकांकडे त्यांनी पैशांची मागणी केली परंतु, कुणाकडूनही लंके यांना पैसे न मिळाल्याने आत्महत्या केली असावी अशी शक्यता त्यांच्या नातलगांनी व्यक्त केली आहे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

Jalgaon Fraud : जळगाव शहरातील डॉक्टराची फसवणूक ; काय आहे प्रकरण ?

Shinde Gat : शिंदे गटाच्या आमदाराची जीभ घसरली ; तुमच्यापेक्षा तर…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button