⁠हॅलो संवाद

पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन

हॅलो जनता (जळगाव) – नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ व्यापक स्वरूपात व्हावी, यात सर्वांनी पुढाकार घेऊन प्रत्येकाने प्रत्यक्षरित्या पाणी बचत करावी. तरच पुढील पिढ्यांना चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होईल, अन्यथा भविष्यात आणखी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी वस्तुस्थिती जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी मांडली.

युनिसेफ, स्मार्ट आणि खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित रेडिओ मनभावन ९०.८ एफएम व जैन इरिगेशन यांच्या संयुक्त विद्यमाने युवा जलसंवर्धन संमेलनात ‘ हंडाजी पाणी बचाओ अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ जैन हिल्सवरील सभागृहात कलश, जल पूजनाने झाला. याप्रसंगी युवराज पाटील बोलत होते. व्यासपीठावर युवराज पाटील यांच्यासह जैन हिल्सच्या कृषी विभागाचे प्रमुख संजय सोनजे, कार्यक्रमाचे संयोजक, रेडिओ मनभावन ९०.८ चे संचालक अमोल देशमुख, उद्यान विभाग प्रमुख अजय काळे, जल अभ्यासक पी. ए. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी जल बचतीची शपथ सर्वांनी घेतली. या उपक्रमासाठी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन आणि प्रसिद्धी विभाग प्रमुख अनिल जोशी यांचे सहकार्य लाभले.

या वेळी जैन इरिगेशन ( जैन हिल्स) च्या मानव संसाधन विभागाचे प्रमुख राजेश आगीवाल, समन्वयक सूचित जैन, मदन लाठी, अधिकारी, कर्मचारी, ‘रेडिओ मनभावन ‘ चे ट्रान्समिशन ऑपरेटर राहुल पाटील, साहिल गायकवाड आदी उपस्थित होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या…

अमळनेर तालुक्यातील शिरुड गावाच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण…

जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध

कृषी विभाग अलर्ट : जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यांकडे कसून तपासणी, फत्तेपूरला सहा जणांना नोटिसा….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button