⁠हॅलो संवाद

Jalgaon : धक्कादायक ! वादळात घर कोसळून चौघे जागीच ठार तर मोठा मुलगा थोडक्यात बचावला…

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वार्‍यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची भयंकर दुर्घटना घडली आहे. तर या कुटुंबातील मोठा मुलगा शांतीलाल नानसिंग पावरा ८ वर्ष यात थोडक्यात वाचला आहे. सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी येथे वादळात रात्री घर कोसळून चौघे जागीच ठार झाले आहेत.

यात एकाच कुटुंबातील पती-पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील चौघांचे शव हे बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. घराचे छत अंगावर पडून गुदमरून मृत्यु झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तर शांतीलाल नानसिंग पावरा ८ वर्ष यात थोडक्यात बचावला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचाार सुरू आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Jalgaon : म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाची ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेता वर धडक कारवाई

Annabhau Sathe Mahamandal: आता मातंग समाजातील १२ पोटजातींमधील व्यक्तींना मिळणार अर्थसाहाय्य, जाणून घ्या योजनेबद्दल माहिती…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button