⁠हॅलो शेतकरी

Jalgaon : अतीपावसामुळे जिल्ह्यात नुकसान, पालकमंत्र्यांचे त्वरित पंचनाम्याचे आदेश

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे नुकसान झालेल्या भागांमधील पंचनामे करुन, तत्काळ शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

जिल्ह्यात गेल्या वर्षी कमी पाऊस झाला होता. मात्र, यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होत आहे. जळगाव, धरणगाव, बोदवड, भुसावळ, चोपडा, मुक्ताईनगर व यावल या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे खरीपच्या पिकांचे नुकसान होत आहे. दररोज होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन, नांगरणी, फवारणी ही कामे देखील करता येत नाहीत. शेतांमध्ये गवत वाढले आहे. तर सखल जमिनीचा भाग असलेल्या शेतांमध्ये पाणी साचले आहे. पिकांची वाढ खुंटली आहे.

यामुळे सरासरी उत्पाद‌नात यंदा घट होण्याची शक्यता आहे, हा धोका लक्षात घेता व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने तत्काळ नुकसानग्रस्त भागांमध्ये जाऊन, पंचनामे करुन नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करण्याच्याही सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिल्या आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

आनदांची बातमी : लवकरच पाचोरा भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नावावर मूळ मालकाच्या नावावर होणार….

देशाचं भविष्य तरुणांच्या हाती मात्र तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतंत्र युवक कल्याण विभाग नाही – आ. सत्यजित तांबे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button