⁠हॅलो क्राईमहॅलो सामाजिक

मैत्रेय कंपनीच्या गुंतवणूकदारांना न्याय मिळणार, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर शासनाची ठोस कारवाई सुरू…

हॅलो जनता प्रतिनिधी मुंबई / जळगाव – 

जळगाव जिल्ह्यातील आणि राज्यातील हजारो गुंतवणूकदारांची मैत्रेय ग्रुप मध्ये फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी न्याय मिळावा यासाठी आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता. अनेक ठेवीदारांनी आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार किशोर पाटील यांनी तत्काळ गृह मंत्रालयाकडे पत्र देऊन सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. या पत्राची तत्काळ दखल घेत राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत गुंतवणूकदारांच्या प्रतिनिधींनी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली.

या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय:

सुमारे ₹२५०० कोटींची फसवणूक झाली असून मैत्रेय ग्रुपच्या गैरव्यवहारामुळे हजारो गुंतवणूकदारांची अंदाजे ₹२५०० कोटींची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणी राज्य शासनाने ठोस कारवाई सुरू केली असून संबंधित यंत्रणांना निर्देश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी राज्यात विविध ठिकाणी ३१ गुन्हे नोंदवले असून ५६ आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे. या कारवाईला आणखी गती देण्यात येणार असल्याचे गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी दिले आहे.

१५०० कोटींचे मूल्यांकन प्रक्रियेत असून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी MPID कायद्यानुसार आरोपींच्या मालमत्तांचे जप्तीकरण सुरू झाले आहे. सुमारे ₹१५०० कोटी किमतीच्या मालमत्तेचे मूल्यांकन पुढील ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांच्या विक्रीद्वारे मिळणाऱ्या निधीतून गुंतवणूकदारांना पैसे परत देण्याची प्रक्रिया ८ ते ९ महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भातील आवश्यक प्रशासनिक प्रक्रियांना गती दिली जाणार आहे.

या संपूर्ण प्रकरणात शासन गुंतवणूकदारांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी बैठकीत मांडली.

आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे ही बैठक आयोजित करण्यात आले असून बैठकीमुळे राज्यातील लाखो गुंतवणूकदारांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे. आता ही प्रक्रिया पारदर्शकपणे आणि वेगाने पार पडावी, अशी अपेक्षा गुंतवणूकदारांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेणार असून शासनाची भूमिका आणि हालचाली पाहता, आगामी काळात फसवणूक झालेल्या सर्व गुंतवणूक धारकांना न्याय मिळेल अशी माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली आहे…

इतर महत्त्वाच्या बातम्या….

निरोप समारंभ ; सर्व कर्मचारी शेतकऱ्यांची एकच भावना “असा अधिकारी होणे नाही”

पाचोरा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश, प्रवेशाच्या वेळी नेमके काय घडले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button